Tuesday, February 9, 2021

केस गळताहेत... वेळीच सावध व्हा.

   २१ वर्षांची केतकी जेव्हा क्लिनिकमधे आली तेव्हा ती रडुन रडुन आपल्या केसांच्या समस्या सांगु लागली, तीचा आत्मविश्वास सुद्धा यामुळे डळमळीत झाला होता. अयोग्य आहार, केसांची निगा न घेणे, जंक फुड/फास्ट फुड चा अतिरेक, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांनी तीचे केस अति प्रमाणात गळत होते व उरलेले केस देखिल रुक्ष, निस्तेज दिसत होते. संपुर्ण हिस्टरी व केस समजुन घेतल्या नंतर मी तीला आश्वस्त केलं. शिरोधारा सारखे काहि पंचकर्म व आयुर्वेदिक औषधींचा वापर करुन ३ महिन्यात तीचे केस गळणे थांबलेच, केस बळकट व चमकदार दिसु लागले. हसत हसत थँक्यु म्हणत ती क्लिनिक मधुन गेली व पुढच्या आठवड्यात तीच्या मैत्रीनीला ट्रीटमेंट साठी घेउन आली.



             खरंच केस हे स्त्रीयांसाठी राणीच्या मुकुटाप्रमाणे असतात व ते स्त्रीयांच्या स्त्रीत्वाचे, सौन्दर्याचे व आत्मसन्मानाचे प्रतिक आहे असे मानले जाते. केस हे स्त्री व पुरुष दोन्हींमध्ये सौंदर्य व व्यक्तिमत्व वृद्धींगत करतात. म्हणुनच जेव्हा केसांचे आरोग्य बिघडुन ते गळु लागतात किंवा टक्कल पडते तेव्हा ते सौंदर्य, आत्मसन्मान व आत्मविश्वास यांना हानिकारक असतात. अकाली केस गळणे हे हल्ली सर्वच व्यक्तिंमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसुन येते. पुर्वी वयाच्या पन्नाशीनंतर अढळणार्‍या केसांच्या समस्या आजकाल ऎन २०- २१ वर्षाच्या तरुण / तरुणींमधे अढळुन येतात. 

केसांच्या समस्यांचे व ते निरोगी ठेवन्याचे उपाय यांचे आयुर्वेदात सविस्तर वर्णन अढळते. आयुर्वेदात केस गळन्यास - खालित्य असे म्हटले जाते व याचे वर्णन शिरोरोगांमधे केले आहे. विकृत पित्त हे वातासोबत प्रकुपित होऊन केसांच्या मुळांना कमजोर करते व.....
अधिक भेट वाचण्यासाठी: https://www.ayurvedanashik.com/post/ayurvedic-treatment-hair-fall-nashik

No comments:

Post a Comment